व्यवहारात आपल्यासाठी काही गोष्टी इतरांनी केल्या तरी चालते. पण परमार्थात मोक्षासाठीचा प्रयत्न ज्याचा त्यानेच करावयास हवा.
उद्धरेदात्मनात्मानं मग्न संसार-वारिधौ ।
योगारूढत्वमासाद्य सम्यग्-दर्शन-निष्ठया ॥ ९ ॥
योगारूढत्वमासाद्य सम्यग्-दर्शन-निष्ठया ॥ ९ ॥
योग्य त्या तत्त्वज्ञानावर निष्ठा विश्वास ठेवून, आणि ज्ञानयोगाचा आधार
घेऊन संसाररूपी सागरात बुडालेल्या (मग्न) स्वतःला (आत्मानं) आपण स्वतःच
(आत्मना) उद्धरून न्यावयाचे आहे.
संसार म्हणजे जन्ममरणाचे चक्र. संसारावर येथे सागराचे रूपक केले आहे.
जन्ममरणरूपी सागरात आपण गटांगळ्या खात आहोत (श्लोक १४३ ). पाण्यात
गटांगळ्या खाणाऱ्या माणसाला भोपळा, तराफा उपयोगी पडतात. ते आपणास तारतील
असा भरवसा हवा. त्याप्रमाणे केवलाद्वैत वेदांत हे योग्य तत्त्वज्ञान आपणास
तारून नेईल अशी निष्ठा हवी. मग त्या तत्त्वज्ञानाचा आधार घेऊन आपण
संसारसागर तरून जावयाचा आहे. दुसरा कोणी आपणास तारेल ही आशा करू नये. आपणच
योग्य तो प्रयत्न करावयास हवा. योग्य ते आत्मज्ञान झाले की संसारातून
उद्धार होतो (श्लोक ६, ४७, ५८) आणि हे आत्मज्ञान आपणच मिळवावयाचे आहे.
'उद्धरेदात्मनात्मानं 'ही ओळ गीतेतील (६. ५) तत्सदृश ओळीप्रमाणे आहे. 'योगारूढ' हा शब्दही गीतेत (६. ४) येतो. पण गीतेतील योगारूढ हा कर्मयोगारूढ आहे. प्रस्तुत श्लोकात निर्देशिलेला 'योगारूढ' हा ज्ञानयोगारूढ आहे हे लक्षात घ्यावे.
'उद्धरेदात्मनात्मानं 'ही ओळ गीतेतील (६. ५) तत्सदृश ओळीप्रमाणे आहे. 'योगारूढ' हा शब्दही गीतेत (६. ४) येतो. पण गीतेतील योगारूढ हा कर्मयोगारूढ आहे. प्रस्तुत श्लोकात निर्देशिलेला 'योगारूढ' हा ज्ञानयोगारूढ आहे हे लक्षात घ्यावे.
No comments:
Post a Comment