Wednesday, January 10, 2018

विवेकचूडामणि श्लोक १० वा

केवळ वैराग्याने काम भागत नाही, तर - 

संन्यस्य सर्व-कर्माणि भव-बंध-विमुक्तये ।
चिंत्यतां पंडितैर्धीरैरात्माभ्यास उपस्थितैः ॥ १० ॥

संसाराच्या बंधनातून सुटण्यासाठी, सर्व कर्मांचा त्याग करून, प्रत्यग् आत्म्याच्या (ज्ञानासाठीच्या) प्रयत्‍नात तत्पर असणाऱ्या विचारी (धीर) शहाण्या माणसांनी आत्म्याचे चिंतन करावयास हवे.

भव म्हणजे संसार, जन्ममरणाचे रहाटगाडगे. जन्ममरण हे कर्मांमुळे येते. कर्मांमुळे माणूस जन्ममरणात म्हणजे संसारात बद्ध होतो. म्हणून कर्मांनी मोक्ष मिळत नाही असे मागे श्लोक ७ मध्ये सांगितले होते. म्हणून आसक्ती आणि अहंकार यांनी युक्त असणाऱ्या सर्व कर्मांचा त्याग व्हावयास हवा. नंतर आत्मज्ञानासाठी गुरूकडे जावयाचे आहे (श्लोक ८ ). गुरूने त्याला आत्मा आणि अनात्मा याविषयी सांगितले आहे (श्लोक १९ ). त्यातील आत्मा या वस्तूबद्दल मुमुक्षूने तत्परतेने चिंतन करावयास हवे (श्लोक १५). मग आत्म्यैक्य ज्ञान होईल (श्लोक ७). आत्माविषयक चिंतन म्हणजेच मनन हे पुनपुनः सतत केले (अभ्यास) तर ते मनात ठसून राहते.

No comments:

Post a Comment