विचाराने आत्मज्ञान होते पण हा विचार करणाऱ्या माणसाजवळ काही पात्रता आणि साहाय्यकारी गोष्टी लागतात.
अधिकारिणमाशास्ते फल-सिद्धिर्विशेषतः ।
उपाया देश-कालाद्याः सत्यस्मिन् सहकारिण ॥ १४ ॥
उपाया देश-कालाद्याः सत्यस्मिन् सहकारिण ॥ १४ ॥
मोक्षरूपी/उरात्मज्ञानरूपी फळाच्या सिद्धीसाठी विशेषकरून अधिकारी/पात्र
व्यक्तीची अपेक्षा असते आणि त्या संदर्भात (अस्मिन्) देश, काल, इत्यादी हे
सहायभूत असतात.
या जगात सर्वांसाठी सर्व नाही. साहजिकच आत्मज्ञान हे वाटेल त्या व्यक्तीला
होत नाही. ज्या व्यक्तीजवळ विशिष्ट पात्रता आहे त्या व्यक्तीला हे ज्ञान
होते. (ही पात्रता पुढे श्लोक १७-२८ मध्ये सांगितली आहे.) लौकिक
व्यवहारातही अधिकार/पात्रता/योग्यता पाहिली जाते. तसेच या संदर्भात देश,
काल इत्यादी पुढीलप्रमाणे उपयोगी ठरतात - अधिकारी पुरुषाने गुरूजवळ जाऊन
आणि राहून (देश) त्याच्याकडून योग्य त्या मार्गाने आत्मज्ञान प्राप्त करून
घ्यावयाचे आहे. मग गुरू जेव्हां प्रसन्न होईल (काळ) तेव्हा ज्ञान मिळेल.
गुरू प्रसन्न होण्यास शिष्याचा विनय, सेवा (आद्याः) इत्यादी गोष्टी
साहाय्यकारी होतात (श्लोक ३६ पहा).
No comments:
Post a Comment