Monday, January 15, 2018

विवेकचूडामणि श्लोक १५ वा

विचार करण्यापूर्वी योग्य तो हितकर्ता गुरू प्राप्त करून घ्यावयास हवा. 

अतो विचारः कर्तव्यो जिज्ञासोरात्म-वस्तुनः ।
समासाद्य दया-सिंधुं गुरु ब्रह्मविदुत्तमम् ॥ १५ ॥

उत्तम ब्रह्मवेत्ता/ब्रह्मसाक्षात्कारी आणि दयेचा सागर असा गुरू प्राप्त करून घेऊन, आत्मवस्तू जाणून घेऊ इच्छिणाऱ्या पुरुषाने गुरूच्या वचनाला अनुसरून विचार करावयाचा आहे.

जो हितकर्ता गुरू शोधावयाचा आहे तो ब्रह्मवेत्ता हवा. जर गुरूच ब्रह्म जाणणारा नसेल तर तो ब्रह्मजिज्ञासू शिष्याला काय सांगू शकेल ? तसेच ब्रह्मवेत्ता गुरू दयाळू हवा. त्याला ब्रह्मजिज्ञासू शिष्याची करुणा आली तर तो त्याच्या कल्याणासाठी त्याला आत्मोपदेश करील. पण केवळ त्या उपदेशाचे श्रवण करून भागणार नाही. गुरूच्या उपदेशाचा विचार/चिंतन/मनन होणे आवश्यक आहे. तरच ते गुरूपदिष्ट ज्ञान मनात ठसून राहील.

No comments:

Post a Comment