जर कर्मांनी मोक्ष मिळत नाही तर श्रुति-स्मृतींनी
कशासाठी कर्मे सांगितली आहेत ? या प्रश्नाचे उत्तर देऊन, कर्मांनी मोक्ष
मिळत नाही, असे श्लोक ११ सांगतो.
चित्तस्य शुद्धये कर्म न तु वस्तूपलब्धये ।
वस्तु-सिद्धिर्विचारेण न किंचित् कर्म-कोटिभिः ॥ ११ ॥
वस्तु-सिद्धिर्विचारेण न किंचित् कर्म-कोटिभिः ॥ ११ ॥
चित्ताच्या शुद्धीसाठी उपयोगी म्हणून कर्म सांगितलेले आहे; कर्म हे
ब्रह्म/आत्मा वस्तूच्या उपलब्धीसाठी उपयोगी पडणारे नाही. आत्मवस्तूची
प्राप्ती ही विचाराने होते, कोट्यवधी कर्मे करूनही होत नाही.
श्रुति-स्मृतींनी जी काही कर्मे सांगितली आहेत, ती चित्ताच्या शुद्धीसाठी
उपयोगी पडतात. निष्कामपणाने केल्या जाणाऱ्या कर्मांनी चित्ताची शुद्धी होते
म्हणजे चित्तातील काम, क्रोध इत्यादी विकार बाजूला जातात. शुद्ध झालेल्या
चितात ज्ञान प्रगटते आणि मग त्या आत्मज्ञानाने मोक्ष मिळतो.
आत्मप्राप्तीच्या संदर्भात कोट्यवधी कर्मेही निष्कळ ठरतात.
आत्मा/ब्रह्म या परमोच्च तत्त्वाला 'वस्तू'असे म्हटले जाते. वस्तू म्हणजे सतत सदोदित नित्य असणारा पदार्थ. अशी वस्तू एकच आहे आणि ती म्हणजे आत्मा अथवा ब्रह्म. या आत्मवस्तूची प्रगती विचाराने म्हणजे विचारजन्य ज्ञानाने होते. ''विचारात जायते ज्ञानम्'' असे पंचदशीकाराचे वचन आहे. आत्मवस्तूचा विचार म्हणजे चिंतन/मनन झाले की आत्मज्ञान होते. आत्मज्ञानाने/ब्रह्मज्ञानाने ब्रह्माची प्राप्ती होते. ''ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति'' असे एक उपनिषद सांगते.
आत्मा/ब्रह्म या परमोच्च तत्त्वाला 'वस्तू'असे म्हटले जाते. वस्तू म्हणजे सतत सदोदित नित्य असणारा पदार्थ. अशी वस्तू एकच आहे आणि ती म्हणजे आत्मा अथवा ब्रह्म. या आत्मवस्तूची प्रगती विचाराने म्हणजे विचारजन्य ज्ञानाने होते. ''विचारात जायते ज्ञानम्'' असे पंचदशीकाराचे वचन आहे. आत्मवस्तूचा विचार म्हणजे चिंतन/मनन झाले की आत्मज्ञान होते. आत्मज्ञानाने/ब्रह्मज्ञानाने ब्रह्माची प्राप्ती होते. ''ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति'' असे एक उपनिषद सांगते.
No comments:
Post a Comment