आत्म्याविषयी योग्य विचार कसा करावयाचा ते पुढील श्लोक सांगतो.
अर्थस्य निश्चयो दृष्टो विचारेण हितोक्तितः ।
न स्नानेन न दानेन न प्राणायाम-शतेन वा ॥ १३ ॥
न स्नानेन न दानेन न प्राणायाम-शतेन वा ॥ १३ ॥
आप्ताच्या (हित) वचनाला अनुसरून विचार केल्याने श्रेष्ठ वस्तू (अर्थ) काय
आणि कशी आहे याचा निश्चय होतो असे दिसून येते. हा निश्चय स्नान, दान किंवा
शेकडो प्राणायाम यांच्याद्वारा होऊ शकत नाही.
विचाराने आत्मवस्तूचे ज्ञान होते हे खरे पण हा विचार आपले हित करू शकणाऱ्या
पुरुषाच्या वचनाला अनुसरून व्हावयास हवा. हा हितकारक पुरुष म्हणजे आपला
गुरू (श्लोक ८ पहा). गुरूला आत्मसाक्षात्कार झाला आहे. साहजिकच विचार कसा
करावा हे तोच सांगू शकतो. त्याच्या वचनाला अनुसरून विचार झाला असता
आत्मवस्तूचे निश्चित ज्ञान होऊ शकते. येथे हित म्हणजे व्यावहारिक हित करू
इच्छिणारा पुरुष असा मात्र अर्थ नाही.
कितीही कर्मे केली तरी मोक्षदायक ज्ञान होत नाही. तीर्थक्षेत्री जाऊन त्रिकाल स्नाने केली अथवा कोट्यवधी दाने दिली तरी पुण्यप्राप्ती होईल पण आत्मवस्तूचे ज्ञान होणार नाही. तसेच शेकडो वेळा प्राणायाम केला तर फार तर शरीरशुद्धी, नाडीशुद्धी होईल पण आत्मवस्तूचे ज्ञान मात्र कधीच होणार नाही.
कितीही कर्मे केली तरी मोक्षदायक ज्ञान होत नाही. तीर्थक्षेत्री जाऊन त्रिकाल स्नाने केली अथवा कोट्यवधी दाने दिली तरी पुण्यप्राप्ती होईल पण आत्मवस्तूचे ज्ञान होणार नाही. तसेच शेकडो वेळा प्राणायाम केला तर फार तर शरीरशुद्धी, नाडीशुद्धी होईल पण आत्मवस्तूचे ज्ञान मात्र कधीच होणार नाही.
No comments:
Post a Comment